Blog
ज्ञान प्रबोधिनीची ती अंबाजोगाईतील पहिलीच गणेशोत्सव मिरवणूक असल्याने, संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह, शिस्त आणि नवी ऊर्जा ओसंडून वाहत होती. या पहिल्या प्रवासाला अभूतपूर्व कष्टांची जोड लाभली होती. प्रबोधिनीच्या संस्कारांत वाढलेल्या मुलांनी जीव तोडून तालीम केली होती, विविध नृत्यांचे सराव आणि ‘बर्ची’ची ती जबरी तयारी, सर्व काही अगदी परिपूर्ण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील […]
कोविडचे भरमसाठ आकडे चीनमधून येत होते. एक विचारप्रवाह असा होता की, हा व्हायरस भारतामध्ये येणे शक्य नाही. त्यात येऊ घातलेला उन्हाळा, त्यामुळे तर हा व्हायरस टिकणे अशक्यच आहे; सगळेच गाफील होते. पण एक माणूस मात्र यामध्ये गाफील नव्हता. कारण त्याने खूप लहानपणापासून एक ओळ नित्याने म्हटलेली होती, ती म्हणजे—‘अभ्यास देशस्थितीचा समतोल चालवू’. आणि त्या अभ्यासाच्या […]